धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते
बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे मिनाक्षी देवकते-डोमाळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धनगर समाजाने एकेकाळी देशासाठी लढा देवून आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्याला इतिहास साक्षी आहे. आज मित्तीला राज्यातील वेगवेगळ्या भागात सर्वदूर पसरलेला धनगर समाज लोकसंख्येने राज्यात जवळपास अडीच कोटीच्या घरात असून जवळपास 200 विधानसभा मतदारसंघावर परिणाम करणारा आहे. सदर समाजाची आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी भुलथापा देवून फसवणूक केलेली आहे आणि हक्काच्या एसटीआरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेले आहे. समाजाच्या जिव्हाळ्याची मागणी विद्यमान सरकारने पुर्ण करावी अशी राज्यातील धनगर बांधवांची मागणी व अपेक्षा आहे तरी सदरील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर न सोडवल्यास सरकारने होणार्या परिणामास सामोरे जावे लागेल तसेच राज्यभर धनगर भगिनींच्या वतीने तीव्र महिला आंदोलन छेडले जाईल असेही पत्रकाद्वारे मिनाक्षी देवकते -डोमाळे यांनी म्हटले आहे.
————-