*निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा
प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन
मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी
वडवणी दि.२३(प्रतिनिधी)-
श्रावणबाळ संजय गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करावे तसेच दर्जेदार अन्नधान्याचा पुरवठा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बीड जिल्हा संघटिका सौ. प्रमिलाताई माळी (ओतारी) यांनी वडवणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना व दिव्यांगांना अनेक महिन्यापासून त्यांना पगारी झाल्या नाहीत त्यांच्या तात्काळ पगारी करण्यात याव्यात तसेच स्वस्त धान्य अन्नपुरवठ्यातील नुकत्याच दिल्या गेलेल्या ज्वारी व अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे आहे त्याचा गोरगरीब, सामान्य लाभार्थ्यांच्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होण्याची संभावना आहे त्यामुळे संबंधित पुरवठादारावर तात्काळ कारवाई करावी दर्जेदार चांगले अन्नधान्याचा पुरवठा करावा नसता शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव तसेच महिला आघाडी बीड जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना बीड जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वडवणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ.प्रमिलाताई माळी(ओतारी) माजलगाव,आष्टी विधानसभा जिल्हा संघटिका यांनी दिला आहे.