कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बीड दि.24 (प्रतिनिधी)-संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजयमाला सहजराव उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून आयु. प्रशांत वासनिक, अण्णासाहेब शेळके, चंद्रप्रकाश शिंदे, अर्जुन जौंजाळ, अविनाश पायके, पत्रकार आयु. आत्माराम वाव्हळकर यांची उपस्थिती होती.
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या कल्याण नगर येथे
तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती गुरुवार दिनांक 23 मे रोजी
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या बुद्धवंदने नंतर अविनाश पायके, अण्णासाहेब शेळके, अर्जुनराव जंजाळ, चंद्रप्रकाश शिंदे, पत्रकार आत्माराम वाव्हळकर, यांनी गौतम बुद्धाच्या जीवनावर आपले विचार मांडले.
या वेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना आयु. प्रशांत वासनिक यांनी भारत देशाला समृद्ध आणि बलशाली बनविण्यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज असुन सुखी जीवनासाठी विचार आत्मसात करा असे आवाहन करून पाच शिला पैकी एक शिलाचे महत्व पटवून दिले व स्वखर्चातून ज्या मुलांनी बुध्दांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञाचे पाठातंर केले अशा 10 मुलांना भारताचे संविधान व बुद्ध ऍन्ड धम्म हे ग्रंथ भेट दिले. त्यानंतर आयु चंद्रप्रकाश शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या बुद्धांची आचार संहिता असल्याचे प्रतिपादन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयु. अण्णासाहेब शेळके यांनी आपले विचार व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी योग्यता वाढविण्यासाठी जे भेट म्हणून दिलेले भारतीय संविधान आहे. ते परिपूर्ण वाचन करून जीवनातील योग्यता वाढविण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. तर अर्जून जौंजाळ यांनी बुध्दांच्या मार्गाने नैतिकतेचा मार्ग स्वीकारला तर जीवनात यश हमखास असल्याचे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 22 प्रतिज्ञा पाठांतर केल्या त्यामध्ये प्रणिता सुधाकर सहजराव, प्रज्ञा हिरामण किर्ते, योगिता गौतम किर्ते, साधना परमेश्वर किर्ते, संदिप शिवाजी किर्ते विशाल उत्तम किर्ते नेहा शिवाजी किर्ते,
डॉ. आदित्य किर्ते व अभिजीत चिंतकांत किर्ते यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल व अश्विनी मनोहर किर्ते हिने दहा दिवस विपश्यना शिबीर इगतपूरी येथे पूर्ण केल्या बद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक किर्ते, हिरामन किर्ते, हिरामण किर्ते , सुधाकर सहजराव, भीमराव वावळकर, शिवाजी किर्ते, महादेव किर्ते, अरुण चांदमारे, परमेश्वर किर्ते, सिद्धार्थ किर्ते, मनोहर किर्ते, तसेच सुलाबाई किर्ते, चंद्रकला किर्ते, कमल अंभूरे, सुमन वावळकर, राधाबाई किर्ते,
माया किर्ते, सविता किर्ते,प्रेरणा चांदमारे, लक्ष्मी किर्ते, राधाबाई किर्ते यांच्या सह गावातील लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयु, चंद्रकांत किर्ते यांनी केले तर बहारदार सुत्रसंचलन देवीदास राऊत यांनी तर आभार हिरामन किर्ते यांनी मानले. खिरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.