युवकानो आत्महत्या करू नका,
संयम बाळगा- डॉ. संजय तांदळे
बीड दि.१२(प्रतिनिधी) : लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरणामुळे निसटता पराभव जिव्हारी लागल्यामुळे लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे यांनी निवडणुकी अगोदर ताई पडल्या तर मी जीव देईल अशी पोस्ट करत व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ताईचा पराभव झाल्यानंतर काही दिवसातच त्याने आत्महत्या केली. तसेच आंबेजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग सोनवणे याने रविवारी सकाळी शेतात जाऊन टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच पोपटराव वायबसे यांनी देखील नुकतीच आत्महत्या केली आहे. स्वतःला संपून घेणे हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे . स्वतः पंकजाताईंनी व आपण सर्वांनी मिळून मोठ्या मनाने पराभव स्वीकारला आहे. पंकजाताईंनी नुकतेच आत्महत्या केलेल्या युवकांना उद्देशून आवाहन केले आहे की, मी पराभव स्वीकारला आहे आणि तो पचवला आहे. पराभव तुम्हीही पाचवा माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. कुटुंब उघड्यावर पाडून आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनात प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा. असा संदेश युवकांना नुकताच पंकजाताई ने दिला आहे. आपला समाज मूळचा राजस्थान येथील असून बहुतांश वंजारी समाजात मेवाड नरेश महाराणा प्रताप व पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरीने लढताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आपले सर्वांचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या सैन्यात देखील मावळे म्हणून आपण उत्तम कामगिरी केली आहे .शिवाजी महाराजांनी प्रताप गडावरील उत्तम कामगिरीबद्दल बागोजी महाराज गर्जे यांना प्रतापराव पदवी बहाल केलेली आहे. आष्टी तालुक्यातील नागझरी गावचे भागोजी महाराज गर्जे यांनी इंग्रजा विरुद्ध व निजमा विरुद्ध लढण्याचा इतिहास ताजा आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा तसेच आपले दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना सातत्याने आपल्या जीवनात संघर्ष करावा लागला आहे. पुढे चालून पंकजाताईंना देखील अनेक दुःख पचवत आपला संघर्ष पुढे चालू ठेवला आहे. पंकजाताई मुंडे दिनांक 16 जून 2024 पासून आभार दौरा करून आपणा सर्वांशी संवाद साधणार आहेत .त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे .येणारा काळ फक्त गुणवत्तेचा आणि गुणवत्ता पूर्ण कौशल्याचा राहणार आहे . यात आपण झोकून देत प्रगती केली पाहिजे व इतरांना सहकार्य केले पाहिजे .मुंडे साहेबांचे गुण आत्मसात करून आपण प्रत्येकाने आपल्याच भागात , गावात कार्य केले पाहिजे. प्रत्येक गावात आपण वर्गणी गोळा करून दरवर्षी किमान दहा ते पंधरा लाखाचा सप्ता आयोजित करतो. यातील काही रक्कम राखीव ठेवून गावातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिली पाहिजे. युवकांनो आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा असे आवहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय तांदळे यांनी केले आहे.