श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
बीड दि.११ (प्रतिनिधी)- लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी दि. ११ मे रोजी बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या शालेय मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. श्री नारदस्वामी विद्यालयाच्या या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बडेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ लहुरी संस्थेचे संचालक श्री प्रसादजी संपतराव खांडेकर हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री चौरे सर, श्री. कागदे सर आणि श्री. शिरसट सर,श्री शेंडगे सर आदी उपस्थित होते.
बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यामंदिर या शाळेत रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी
शाळेत 2002 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपासून ते 2024 या शैक्षणिक वर्षात शाळेतून दहावी पास झालेल्या एकूण 23 वर्षांच्या काळातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री प्रसादजी संपतराव खांडेकर यांनी केले. या स्नेह मेळाव्यासाठी विद्यालयाचे मागील तेवीस वर्षातील सर्व विद्यार्थी एकत्र जमले. सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला असला तरी पण श्री नारद स्वामी विद्यालयाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येक विद्यार्थी बोलून दाखवत होता. या वेळी सर्व विद्यार्थी लहान होऊन शाळेमध्ये रमले होते, या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जून्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी छड्या ही खाल्ल्या. हसत खेळत संपूर्ण दिवस कसा गेला हे कोणालाच कळले नाही. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कागदे सर आणि श्री. शिरसट सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे कर्मचारी श्री. राठोड यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनिकरीता सचिन बुरांडे, ज्ञानेश्वर बामदळे, देवेंद्र सोनवणे सोमनाथ भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना बाकी सर्व विद्यार्थी मित्रांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण महानोर यांनी केले तर आभार यांनी मानले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असलेले शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
________________________________