*थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का*
आजचे आपले युग हे विज्ञानाने खूप प्रगत झालेले आहे विज्ञानाने निर्माण झालेले अनेक विविध सुख उपयोगी संसारिक उपयोगी वस्तू आपण आज सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये वापरत आहोत आपले काम कसे सहज आणि पटकन होतील त्या कामांना कुठलेही परिश्रम लागणार नाही यासाठी आपण ही इलेक्शन निकाल सर्रासपणे वापरत आहोत त्यामध्ये फ्रीज, कुलर, अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप असे अनेक विविध वस्तूंचा व साधनांचा आपण वापर करतो ते जेवढे सोयीस्कर आहे तेवढेच विघातक सुद्धा आहेत याची प्रचिती हळूहळू आपल्याला येत आहे. फ्रिज रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे त्यातील गार हवा ही जेव्हा बाहेर उघडल्यानंतर बाहेर येते तेव्हा ती वातावरणात न मिसळतात ओझोन वायू पर्यंत पोहोचतील आणि त्यामुळेच ओझोन वायूला आज मोठमोठे भगदाड पडलेली आहेत ती आपल्या पृथ्वीच्या संरक्षण कवचाला सुद्धा धक्का देत आहेत त्यातच आपण विविध अन्नपदार्थ फ्रिजमध्ये साठवून ठेवतो पूर्वी खरं म्हणजे फ्रीज हे औषधी, फळ काही वेळेसाठी किंवा तासासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी होत होता परंतु आज त्याचा वापर खूप प्रमाणात होताना दिसत आहे त्याचा विपरीत परिणाम आज आपल्या शरीरावर होताना दिसत आहे भाजीपाला आल्यानंतर तो सहसा सर्रास प्लास्टिकच्या पन्या यामधून आणला जातो आणि त्या आणल्यानंतर तो भाजीपाला त्या पण या प्लास्टिकच्या पण यांसह त्या फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो दोन दोन तीन दिवस त्यामध्ये त्या प्लास्टिकच्या पण ज्ञान सोबत तो भाजीपाला त्या फ्रीजमध्ये थंडगार होत असतो प्लास्टिक जेवढे घातक आहे तेवढेच फ्रीज सुद्धा त्यामुळे दिवसेंदिवस कॅन्सर सारखे भयानक आजार बळावत आहेत. सध्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे फार मोठे वेड लागलेल आहे आपल्या घरी दोन पाहुणे जरी आलेत तरी त्यांना हॉटेलमध्ये नेऊन जेवण केले जाते नाही तर सरळ हॉटेलमधून भोजनच पार्सल म्हणून घरी आणले जाते ते हॉटेलमध्ये तयार केलेले अन्न त्याचा वापरलेला मसाला काही अन्न पदार्थ हे हॉटेल वाले दोन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याचा उपयोग करतात तर काही दूध डेअरी वाले पनीर तयार करून ते सुद्धा प्लास्टिकच्या पन्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये आठ आठ दहा दहा दिवस ठेवून त्याची विक्री करतात त्याचप्रमाणे आईस्क्रीम विक्रेते सुद्धा आईस्क्रीम प्लास्टिकच्या ग्लासेस मध्ये ठेवून ते फ्रिजमध्ये आठ आठ दिवस फ्रिझर मध्ये ठेवून ते विक्री करतात त्यातील आपल्या शरीरासाठी लागणारे जे दुग्धजन्य पदार्थांमधून विटामिन्स मिळतात ते अगोदरच फ्रीजमध्ये जास्त दिवस राहिल्याने नष्ट झालेले असतात. काही शौकीन लोक तर नॉनव्हेज तीन तीन चार चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून खातात कोणते विटामिन्स असतील त्यामध्ये एवढ्या दिवसानंतर,फक्त ते अन्न पोट भरण्यासाठी आहे शरीराला लागणारे विटामिन म्हणून नाही त्यासाठी सर्वांनी फ्रीजचा उपयोग कमीत कमी करावा नाहीच केला तर काहीही फरक पडत नाही दररोज ताजा भाजीपाला आणावा संसोधनाने असे सुद्धा सिद्ध केलेले आहे की फ्रिजमध्ये आपण भात, बटाटे, टमाटे, सोललेला लसूण, अद्रक या खाद्य वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावर वेगळ्या प्रकारची बुरशी तयार होते रोजच्या आहारातून ते आपल्या शरीरात जाते व त्यापासून अनेक व्याधी, पोटाचे विकार यांच्यासारखे आजार निर्माण होत आहेत ही सुद्धा एक फार मोठी धोक्याची घंटा आहे. त्यासाठी ताज खा, फ्रीजचे अन्न टाळा आणि आरोग्य वाचवा. एवढे तरी आपल्या हातात आहे ते नक्की करा व इतरांनाही सांगा. थंड कुल कुल हे फ्रिज आपल्या शरीराला अनेक आजारांचा धक्का देत असल्याचे अनेक संशोधनातून व आपल्यासमोर त्याचे वाईट परिणाम दिवसेंदिवस दिसत आहेत आता तरी आपण सर्वांनीच सावध होण्याची गरज आहे आणि इतरांनाही सावध करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद.
डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर
अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर
नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी ता. मुक्ताईनगर
मो. 9158726448