06/09/25

उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला साहित्यातून मांडणारा आवाज म्हणजेच अण्णाभाऊ साठे:पप्पू कागदे

उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला साहित्यातून मांडणारा

आवाज म्हणजेच आण्णाभाऊ साठे:पप्पू कागदे

बीड दि.01(प्रतिनिधी)- साहित्य सम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा अनु-जाती जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून अभिवादन रॅली व क्रांती मशाल रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांना अभिवादन करण्यात आले. वास्तववादी साहित्य निर्माण करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या हयातीत 15 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, पटकथा, नाटके, पोवाडे यांच्या माध्यमातून साहित्याचा डोंगर उभा केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार होते. फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून म्हणाले की “जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव” या महीप्रमाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानीत होते. फकीरा कादंबरीला 1961 साली राज्य सरकारकडून उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखाणात संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण बेळगाव हे कर्नाटकमध्ये विलीन करण्यात आले. तेव्हा अण्णाभाऊंनी कवन रचून महाराष्ट्र प्रेम व्यक्त केले. “माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली” साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला जगासमोर मांडून त्यांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण केलेले साहित्य आजच्या युवक पिढीने आत्मसात करून इतरांना वाचण्यासाठी प्रवृत्त केले तरच अण्णाभाऊ साठे यांना खरे अभिवादन ठरेल.
असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती प्रसंगी केले. यावेळी मा. आ.राजेंद्र जगतात, राजू जोगदंड, किसन तांगडे, अशोक लोढा, प्रकाश कानगावकर, अजय सवाई, शेख निजाम, दादा हातागळे, विकास बामणे, मायाताई मिसळले, रेश्मा ताई जोगदंड, शोभा गलांडे, महेश आठवले, बापू पवार, शेख खदीरभाई, नागेश अण्णा दुबळे, प्रभाकर चांदणे,अविनाश जोगदंड, विलास जोगदंड, दिलीप खंदारे, नाना मस्के, शितलकुमार सुकाळे, भैय्या साळवे, भैय्या मस्के, सुभाष तांगडे, अरुणा निर्मळ, अनिता तुरूकमारे, उषा सोनकांबळे, कविता कोरडे, माया साबळे, अक्षय कोकाटे, सतिष शिनगारे, संभाजी गायकवाड, शाम वीर, के.के.कांबळे, नागेश शिंदे, भाऊसाहेब दळवी, नामदेव वाघमारे, रतन वाघमारे, भास्कर जावळे, नवनाथ डोळस, महेंद्र वडमारे, मनोज बोराडे, अप्पा मिसळे, पप्पू वाघमारे, गणेश वाघमारे, पिंटू गव्हाणे, दीपक कांबळे, प्रताप धन्वे, रमेश जावळे, सचिन वडमारे, जितू धन्वे, बाबू भालेराव, संजय हनवते, बबन वाघमारे, कृष्णा पाटोळे, अजिंक्य वडमारे, सोनू वडमारे, विशाल साळवे, बिभीषण जावळे, गोरख जोगदंड, प्रकाश वडमारे, रामेश्वर खळगे, सनी जोगदंड, बबलू जोगदंड, विशाल मीसळे यांच्यासह हजारो कार्यकर्तेअभिवादन रॅलीत सामील झाले होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …