21/06/25

पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन

पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन.         बीड दि.९(प्रतिनिधी)-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे निराश झालेल्या या ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बीड लोकसभा निवडणूक मध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव अनेक जणांच्या जिव्हारी लागला. सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पचनी पडताना पाहायला मिळत नाही. अनेकांना पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय करियर संपुष्टात आले असे वाटत आहे. म्हणूनच पांडुळ गव्हाण येथे गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत गावातील मंदिरात बैठक बोलावली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा ठरवा ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला.

पाथर्डी शिरूर नंतर परळी बंदची हाक

पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात रविवारी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडिया वरती वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट फिरत आहेत. यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या संदर्भात सुरुवातीला पाथर्डी शहर बंद करण्यात आलं. त्यानंतर शनिवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आलं होतं आणि आता रविवारी परळी शहर बंद ठेवणार असल्याचा निर्णय हा वंजारी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
परळी शहरातील लोक हे पोलीस स्टेशनमध्ये जमून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे लोक वादग्रस्त पोस्ट करत आहेत त्यांना पायबंद घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …